‘मंकीगेट’ प्रकरणामुळेच अँड्रय़ु सायमंड्सला वगळले- पॉटिंग

नवी दिल्ली- २००८ मध्ये भारताचा क्रिकेटपटू हरभजनसिंग याने कसोटी सामन्यात सायमंड्सला जातीय अपशब्द उच्चारल्याचे आरोप करण्यात आले होते. त्या-मुळे हे प्रकरण त्यापकाळी चांगलेच गाजले होते. या ‘मंकीगेट’ प्रकरणामुळेच अँड्रय़ु सायमंड्सची क्रिकेट कारकीर्द लवकरच संपुष्टात आली, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.

यावेळी पुढे बोलताना रिकी पॉटिग म्हणाला, ‘त्याकाळी सायमंड्सला या प्रकरणात अपेक्षेइतके सहकार्य आमच्या क्रिकेट मंडळाकडून लाभले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दबावापुढे क्रिकेट ऑस्ट्रेलिया झुकली. जर आमच्या क्रिकेट संघटकांनी हे प्रकरण लावून धरले असते तर भारतीय खेळाडूचा खरा चेहरा उघडकीस आला असता व सायमंड्स याची कारकीर्द सुरळीत झाली असती.’

त्याकाळात ऑस्ट्रेलियाने मला आदेश दिल्याप्रमाणे मी करीत राहिलो. मात्र अन्य काही संघटकांनी भारतीय संघटकांवर दबाव आणला असता, हरभजनवर तीन वर्षांची बंदी आणली गेली. मात्र भारतीय संघटकांनी त्याविरुद्ध अपील करीत त्याची शिक्षा रद्द करण्यात यश मिळविले. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला, असेही पॉटिंगने यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Comment