
मुंबई – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत टोल भरणार नाही आणि जनतेनेही टोलभरू नये असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले. टोलच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर काय चर्चा झाली, कोणती आश्वासने मिळाली याची त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिली. महाराष्ट्रातील टोल वसुलीतील अनियमितता पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे राज यांनी सांगितले.