हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार शुभारंभ

वृत्तसंस्था, सोची- रशियाच्या सोची शहरात हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार शुभारंभ झाला. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये एकूण तीन हजार एथलिट्स सहभागी झाले आहेत. भारताकडून शिवा केशवन, नदीम इकबाल आणि हिमांशु ठाकूर हे तिघेजण या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सामील झालेत. मात्र या ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यातच भारताची मान शरमेने झुकली आहे. कारण की, या सोहळ्यात भारतीय एथलिट्सना देशाची शान असलेला तिरंगा अभिमानाने फडकवता आला नाही.

आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर केलेली निलंबनाची कारवाई. त्यामुळे या ऑलिम्पिकच्या कोणत्याही खेळात सहभागी होण्याआधी भारताचा मोठा पराजय झाला आहे. कारण एखाद्या भारतीय एथलिटने मेडल जिंकल्यानंतर ते भारताचे होणार नाही.

या शिवाय भारताचे राष्ट्रगीत जन-गण-मन सुद्धा वाजवण्यात येणार नाही. त्याऐवजी ऑलिम्पिक धून वाजवली जाईल. या घटनेमुळे सा-या जगासमोर भारताचा मोठा अपमान झाला आहे. आगामी काळात होत असलेल्याश ऑलमपीक स्पगर्धेत सर्वजण कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment