
गेली तीन दशके कम्युनिस्ट चीनमध्ये कडकपणे राबविल्या गेलेल्या एकच अपत्य योजनेचे दुष्परिणाम जाणवू लागले असून उपवर चिनी मुलांना वधू मिळणे दुरापास्त बनले आहे. परिणामी या मुलांनी परदेशातील मुली मिळविण्याची धडपड सुरू केली असल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये मुलगा हाच वंशाचा दिवा असतो असा समज अन्य आशियाई देशांप्रमाणेच दृढ आहे. त्यामुळे आजही मूल जन्माला येण्याअगोदरच मुलगा की मुलगी हे तपासले जाते आणि मुलगा असेल तरच जन्माला घातला जातो. त्यात एकच मूल योजनेत अशा अनेक मुलींची गर्भातच हत्या केली गेल्याने चीनमध्ये आता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. आणि त्यातूनच वरील जटील समस्या निर्माण झाली आहे.
