पुण्याच्या रखडलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्रीच जबाबदार- अजित पवार

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचे अनेक प्रश्न शासनाकडे रखडले आहेत. महापालिका हद्दीत नव्याने तेवीस गावे समाविष्ट करण्याचा प्रस्तावासह पुण्याच्या अनेक रखडलेल्या प्रश्नांना सर्वस्वी मुख्यमंत्री चव्हा्णच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री अनेकदा पुण्यात येऊन गेले; प्रश्न काही मार्गी लागले नाहीत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता बाबांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यामुळे अनेक कामे रखडले असल्यापचा अरोप मंत्रीमंडळ बैठकीत केला होता.

पुणे महापालिकेतर्फे आयोजित एका कार्यक्रमासाठी उपमुख्य मंत्री अजित पवार हे पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हमणाले, महापालिका हद्दीत नव्याने तेवीस गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांमुळेच रखडला आहे. ती फाइल मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीअभावी त्यांच्या खात्यातच थांबली आहे. विकास योग्य पद्धतीने करायचा असेल, तर निर्णय तातडीने घेणे आवश्यक असते. अन्यथा प्रकल्पांची, कामांची किंमत वाढत जाते. मात्र, राज्य शासनाकडून असे निर्णय लवकर होत नसल्यामुळे अनेक अडथळे उभे राहत आहेत.

पुणे शहरातील प्रलंबित प्रश्नांसंबंधी आमदारांनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्याबाबतही निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; पण निर्णय काही झाले नाहीत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियमावली देखील रखडली आहे. कामाची संधी मिळाली, तर कामे तत्परतेने मार्गी लावता येतात. काही दिवसांनंतर आता आचारसंहिता लागेल त्यामुळे आता काही दिवसच शिल्लक असल्याने लवकरच काम पूर्ण करावी लागणार आहेत असेही यावेळी बोलताना पवार यांनी स्प्ष्ट केले.

Leave a Comment