बिहार ग्ऱा़पं़चा निर्णय : अविवाहित मुलींनी मोबाईल वापरू नये

पाटणा – अविवाहित मुलींनी मोबाईल फोनचा वापर करू नये, असा फतवा बिहारमधील ग्रामपंचायतीने काढला आहे. एखाद्या मुलीने या फतव्याचा भंग केल्यास तिच्या कुटुंबीयांना जबर दंड आकारला जाईल, असा इशाराही या पंचायतनी दिला आहे. पश्चिम चंपारण्य जिल्ह्यामधील सोमगड पंचायतीच्या काल (मंगळवार) रात्री झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

सोमगडच्या महिला सरपंचाचे पती झाकीर अन्सारी हेच पंचायतीचा कारभार पाहतात. ते म्हणाले, ह्लशेकडो गावकºयांच्या मान्यतेनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी सर्व कुटुंबांनी घ्यावी.ह्यह्य मात्र, तरुण मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा अधिकार पंचायतीला नाही, असे बिहारचे पंचायतराज मंत्री भीमसिंह यांनी स्पष्ट केले आहे.

पंचायतीच्या या निर्णयाविरुद्ध त्या गावातील कुणीही तक्रार दाखल केली, तर सरकार पंचायतीविरुद्ध कारवाई करेल, असेही भीमसिंह यांनी सांगितले. मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्याचा बिहारमधील हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी येथील औरंगाबाद जिल्ह्यातील एका पंचायतीनेही शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास आणि ह्यचिथावणी देणारेह्य कपडे घालण्यास मुलींना बंदी केली होती.

Leave a Comment