महाराष्ट्रात मंत्रीमंडळ फेरबदल होणार?

मुंबई – महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळ फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत असून त्या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतलेल्या प्रदेश प्रभारी महासचिव  मोहन प्रकाश यांच्या भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे. या दोघांनीही दोन वेळा मोहन प्रकाश यांची भेट घेऊन दीर्घकाळ चर्चा केली आहे असे समजते.

या भेटीत मंत्रीमंडळ फेरबदलांबरोबरच महामंडळाची रिक्त पदे भरण्यासंबंधीची चर्चाही झाली असल्याचे समजते. नवीन वर्षात ही पदे तसेच महिला आयोगातील रिकामी पदे भरण्यासंबंधीचा निर्णय घेऊन ती भरली जातील असे सांगितले जात आहे. २७ डिसेंबरला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली असून त्यानंतरच नव्या नियुक्त्या केल्या जातील असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment