मी चिंता करत नाही- अभिषेक बच्चन

प्रथमच एकत्र आलेल्या अमिर, अभिषेक व कतरिना यांचा ‘धूम ३’ सिनेमा उद्या शुक्रवारी देशभर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘धूम’ ते ‘धूम ३’ असा प्रवास करणा-या अभिषेक बच्चन याच्या या सिनेमाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. बराच काळ पडद्यापासून दूर असल्याची मी चिंता करत नाही असे अभिषेक बच्चन यावेळी बोलताना म्हणाला.

याबाबत अधिक बोलताना अभिषेक बच्चन म्हणणाला, “माझा ‘बोलबच्चन बोल’ सिनेमापासून एकही सिनेमा आला नाही. मात्र, त्यामुळे माझ्या अभिनयावर कोणताही परिणाम झालेला नाही. बॉलिवूडमधील महत्त्वाचे अभिनेते प्रतिवर्षी एक किंवा दोन सिनेमे करत आहेत. अमिर देखिल गेल्या वर्षापासून ‘तलाश’ नंतर पडद्यावर दिसला नाही. त्यामुळे बराच काळ पडद्यापासून दूर असल्याची मी चिंता करत नाही.”

उदय चोप्रा आणि मी खरे पाहाता ‘धूम’ आहोत असे अभिषेक म्हणतो. जय आणि अली यांची प्रेक्षकांना सतत प्रतिक्षा असते. आम्ही दोघे ‘बॅटमॅन’ आणि ‘रॉबिन’ सारखेच आहोत. असे अभिषेकने सांगितले. ‘धूम’ चित्रपटाच्या टीमने हिंदी सिनेसृष्टीमध्ये अॅक्शन दृष्यांचा नवा पायंडा पाडला आसल्याचे अभिषेकने सांगितले.

Leave a Comment