आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना दिलासा

मुंबई- गेल्याम काही दिवसांपासून सर्वत्र गाजत असलेल्या आदर्श घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिलासा लाभला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल के. शंकरनारायणननी चव्हाण यांच्याविरोधात याप्रकरणी खटला चालवण्यास ‘सीबीआय’ला मनाई केली असून त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याचे आदेशही दिले आहेत. त्या’मुळे चव्हाकण यांच्या वर आता कोणतीच कारवाई करता येणार नाही.

देशातील कोणत्याही लोकप्रतिनिधीवर खटला चालवायचा असल्यास आधी संबंधित राज्याच्या राज्यपालांची कायदेशिरित्यान परवानगी घ्यावी लागते. मात्र, चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी सीबीआयकडून अशी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्याआधारेच सीआरपीसी कलम १९७ अंतर्गत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी सीबीआयला चव्हाण यांच्यावरील कारवाई थांबवण्याचे आदेश दिलेत.

गेल्या काही दिवसांपासून आदर्श घोटाळ्यात चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्यात यावेत तसेच त्यांच्यावर कोणताही खटला चालवण्यात येऊ नये, असे राज्यपालांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. राज्यपालांचा आदेश हा चव्हाण यांच्यासाठी दिलासा तर सीबीआयसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Comment