आयपीएल सातव्या सिझनमध्ये चिअर गर्ल्स नाहीत

मुंबई – आयपीएल क्रिकेट सामन्याच्या २०१४ सालात होत असलेल्या सातव्या सीझनमध्ये चिअर गर्ल्स असणार नाहीत असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले.

सावंत म्हणाले की आयपीएल सामन्यात सहभागी होत असलेल्या चिअर गर्ल्स हे सामन्यांचे मुख्य आकर्षण होते आणि प्रेक्षकांनाही त्यामुळे आनंद मिळत होता. मात्र चिअर गर्ल्सची सामन्यातील उपस्थिती प्रत्येकवेळी नवा वाद आणि चर्चा उपस्थित करत आहे. या गर्ल्स नेहमीच वादाला मिमंत्रण देणार्‍या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचा सहभाग थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून २०१४ सालच्या स्पर्धात त्या असणार नाहीत.

Leave a Comment