भारत पाक अणुयुद्ध झाले तर २ अब्ज मृत्यू

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झालेच तर जगातील किमान २ अब्ज लोक दुष्काळाने मरतील कारण त्यांना अन्नच मिळणार नाही असा निष्कर्ष इंटरनॅशनल फिजिशियन फॉर द प्रिव्हेंशन ऑफ न्यूक्लिअर वॉर संस्थेच्या सह अध्यक्ष इरा हेलफंद यांनी मांडला आहे. असे युद्ध झाले तर मानवी संस्कृतीचा विनाश तर होईलच पण जगाच्या लोकसंख्येच्या पावपट लोक यात मृत्युमुखी पडतील. यासाठी भारत पाकने त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रातील केवळ १ टकका अण्वस्त्रांचा वापरही पुरेसा ठरणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या या फिजिशियनने अणुयुद्धामुळे महाभयंकर दुष्काळ जगात पडेल व त्यातच किमान १ अब्ज लोक ठार होतील असे २०१२ साली केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले होते आता हा आकडा दोन अब्जांवर गेला आहे. पर्यावरण वैद्यानिकांनी प्रकाशित केलेल्या निबंधावर हे आकडे काढले गेले आहेत. या वैज्ञानिकांनी पृथ्वीचे वातावरण अणु स्फोटांच्या प्रभावामुळे कसे असेल याचे मूल्यांकन केले होते.

Leave a Comment