एक्झिट पोलवर कॉग्रेसचा विश्वास नाही

चंडीगड- भाजपला पाचपैकी चार राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार असे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दिसत आहे. त्याटमुळे गेल्याग काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये थोडेसे निरुत्साहाचे वातावरण आहे. निवडणूकीसंदर्भात एक्झिट पोलच्या माध्यामातून येणारे निष्कर्ष बिनकामाचे असतात, अशा शब्दांत काँग्रेसने हे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत. निष्कर्षामुळे विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.

यांनी एक्झिट पोलचे निष्कर्ष फाडून फेकून देण्याच्या लायकीचे असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केली आहे. यावर भाजपचे नेते अरुण जेटली यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर काँग्रेसला पराभव दिसत असल्यामुळे नेते निराश झाले असल्याचा चिमटा काढला आहे.

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीसंदर्भातील विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तर केवळ दिल्लीत कॉग्रेसला चांगल्या जागा मिलतील असा निष्कर्ष या एक्झिट पोलने काढले आहेत.