२६/११ ची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही- आर.आर. पाटील

मुंबई – पाच वर्षांपूर्वी म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती मुंबईत अथवा महाराष्ट्रात होणार नाही अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली आहे. मुंबईसह महाराष्ट्र असल्या दहशतवादी हल्यांपासून पूर्ण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. जर दहशतवाद्यांनी आमच्या राज्यातील नागरिकांना पुन्हा निशाणा बनविण्याचा प्रयत्न केला तर कसाब सारखी त्यांची गत होईल असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

विशेष म्हणजे २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पाटीलच गृहमंत्री होते. त्यावेळी हल्ला रोखण्यात अपयश आल्याने राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती व घटना घडल्यानंतर आठवड्याभराने पाटील यांनी जबाबदारी स्वीकारून मंत्रीपद सोडले होते.त्यानंतर पुन्हा त्यांना गृहखाते देण्यात आले.

Leave a Comment