वेस्ट इंडिजचा विजय, मालिकेत बरोबरी

विशाखापट्टणम – कीरान पॉवेल, डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमॉन्स आमि डॅरेन सॅमी या चौघांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतावर दोन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत भारताने वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी 289 धावांचे आव्हान ठेवले होते. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

त्याआधी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या सलामीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मा (12), शिखर धवन (35) आणि युवराज सिंग (28) धावांवर बाद झाले. तर शिखर धवन आणि युवराज सिंगला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी साकारता आली नाही. शिखर धवनला पेरमॉलने पायचीत पकडले. युवराजने सॅमील फटकावण्याच्या नादात सॅम्युल्सकडे सोपा झेल दिला.

रोहित शर्माला रामपॉलने सॅमीकरवी झेलबाद केले. भारताची मधल्या फळीतील फलंदाज एकापाठोपाठ बाद होत असताना विराट कोहलीने स्वतःचा जम बसवला होता. मात्र त्याला शतक पूर्ण करता आले नाही. ते 99 धावावर बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर कर्णधार महेद्रसिंग ढोणीने 40 चेंडूत 51 धावा करत संघाला 288 धावांची मजल मारून दिली.