सचिन आत्मचरित्र लिहिणार

मुंबई- चोवीस वर्षांची झळाळती क्रिकेट कारकीर्द संपवून निवृत्ती घेतलेल्या सचिन तेंडुलकरने आपली जीवनकहाणी अर्थात आत्मचरित्र लिहिण्याचा विचार व्यक्त केला आहे.

एनडीटिव्हीवरील मुलाखतीत सचिन बोलत होता. तो म्हणाला की क्रीकेट सोडण्याचा निर्णय हा योग्य आहे आणि त्याचा पश्चाताप होत नाही. मात्र माझ्या जीवनाबद्दल अनेक चाहत्यांना उत्सुकता आहे आणि माझ्या आंयुष्याबद्दल माझ्या चाहत्यांना सर्व कळाले पाहिजे अशी माझीही इच्छा आहे. म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर आता आत्मचरित्र लिहणार आहे.

Leave a Comment