
मुंबई – आपल्या क्रिकेट कसोटी कारकिर्दीतील अंतिम सामना खेळत असलेल्या सचिनवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याबाबत सरकार विचार करेल असे सांगितले आहे.
मुंबई – आपल्या क्रिकेट कसोटी कारकिर्दीतील अंतिम सामना खेळत असलेल्या सचिनवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याबाबत सरकार विचार करेल असे सांगितले आहे.
शुक्ला म्हणाले की गेली दोन तीन वर्षे सचिनला भारतरत्न देण्याबाबत विविध स्तरांतून सतत मागणी होत आहे. मात्र या काळात सचिन खेळत होता त्यामुळे त्यासंबंधीचा विचार केला गेला नाही. आता सचिन निवृत्त होत असल्याने त्याला हा सन्मान दिला जावा यासाठी संघटना प्रयत्न करेल व सरकारही त्यावर सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा आहे.