
मुंबई – कारर्कीदीतील अखेरचा 200 वा कसोटी सामना खेळणारा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. सचिन फलंदाजीसाठी मैदानात येत असताना, प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. संपूर्ण स्टेडियममध्ये सचिन, सचिनचा जयघोष सुरु आहे.
मुंबई – कारर्कीदीतील अखेरचा 200 वा कसोटी सामना खेळणारा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. सचिन फलंदाजीसाठी मैदानात येत असताना, प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. संपूर्ण स्टेडियममध्ये सचिन, सचिनचा जयघोष सुरु आहे.
पहिल्या डावातील वेस्ट इंडिजच्या 182 धावांचा पाठलाग करताना, चांगल्या सुरुवातीनंतर भारताचे दोन्ही सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन तंबूत परतले आहेत. धवन 33 आणि विजय 43 धावांवर बाद झाला.
तत्पूर्वी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा सामना असलेल्या भारत-वेस्ट इंडिज दुस-या कसोटी सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. भारताच्या भेदक मा-यासमोर वेस्ट इंडिजचा पहिला डाव 182 धावात संपुष्टात आला. प्रग्यान ओझा आणि रविचंद्रन अश्विनच्या फिरकीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. उपहरानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांमध्ये तंबूत परतण्याची शर्यत लागली होती. वेस्ट इंडिजकडून पॉवेलने सर्वाधिक 48 धावा केल्या. विडिंजकडून एकही मोठी भागीदारी झाली नाही. अश्विन-ओझाच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ओझाने पाच तर, अश्विनने तीन गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार आणि शामीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
ख्रिस गेल (11), ब्राव्हो (29), पॉवेल (48), सॅम्युलस (19) आणि चंद्रपॉल (25) धावांवर तंबूत परतले. 150 वा कसोटी सामान खेळणा-या चंद्रपॉलला (25) धावांवर भुवनेश्वर कुमारने अश्विनकडे झेल द्यायला भाग पाडले. मोहम्मद शामीने भारताला खाते उघडून दिले. ख्रिस गेलच्या रुपाने वेस्टइंडिजला पहिला धक्का बसला. त्यानंतर ब्राव्हो 29 धावांवर बाद झाला. मोहम्मद शामीने ख्रिस गेलला 11 धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केले. ब्राव्होला अश्विनने बाद केले.
कारर्कीदीतील अखेरचा 200 वा कसोटी सामना खेळणा-या सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचे क्षण डोळ्यात साठवून घेण्यासाठी वानखेडे स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. चारही बाजूंनी सचिन, सचिनचा जयघोष सुरु होता. मुंबई क्रिकेट असोशिएशननेही सचिनच्या निरोपाची जय्यत तयारी केली होती. स्टेडियम परिसरात सचिनचे भव्य कटआऊटस झळकत होते सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर, सचिनचे कुटूंबीय, क्रिडा, चित्रपट, राजकारण आणि उद्योग सर्वच क्षेत्रातील सेलिब्रेटी वानखेडे स्टेडियमवर आले होते
सकाळच्या सत्रात पडणा-या दवाचा फायदा घेण्यासाठी ढोणीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर असून, पहिल्या कसोटीत भारताने वेस्टइंडिजचा डावाने पराभव केला होता. त्यामुळे दुस-या कसोटीत भारताचे पारडे जड आहे.