कांद्यानंतर टोमॅटो, बटाट्याची भाववाढ

मुंबई- कांद्याच्या भाववाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून त्रस्त झालेल्या नागरिकांना आता टोमॅटो व बटाट्यानेही हैराण केले आहे. टोमॅटो व बटाटे या दोन्ही महत्त्वाच्या भाज्यांचे भाव वाढल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. टोमॅटोचे भाव दहा किलोला २६० ते ४०० रुपये आहेत. त्यामुळे नागरिकाच्या व चिंतेत भर पडली आहे.

महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान गुजरातहून टोमॅटो येतात. मात्र या वर्षी गुजरातमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे व पुरामुळे तेथील टोमॅटोचे पीक नष्ट झाले आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव दहा किलोला २६० ते ४०० रुपये आहेत. तर किरकोळ बाजारात हेच भाव ५५ ते ६५ रुपये किलो आहेत. सांगली, सातारा आणि नाशिक व इतर जिल्ह्यांतून टोमॅटोचे पीक घेतले जाते.

घाऊक बाजारात बटाटय़ाचे भाव १८ ते २० रुपये तर किरकोळ बाजारात २२ ते २४ रुपये आहेत. एपीएमसीमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब येथून बटाटय़ाच्या ७० ते ८० गाडय़ा येतात. मात्र बटाटय़ाची जुनी आवक संपल्याने भाव वाढले आहेत.

Leave a Comment