विंडीजचे गोलदाजांनी कंबरेडे मोडले

कोलकाता, – ईडन गार्डन्सवर बुधवारपासून सुरू झालेल्या टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेणा-या वेस्ट इंडिजचे टीम इंडियाच्याल गोलंददाजानी कंबरडे मोडले आहे. त्या-चे सहा फलंदाज तंबूत परतले आहेत. ५५ षटकांत वेस्ट इंडिजने १७६धावा केल्या असून त्यांचे सहा फलंदाज बाद झाले आहेत. मोहम्मद शामीने ३ तर भुवनेश्वर कुमारने १ बळी टिपला.

धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल(१८), किरॉन पॉवेल(२८), ब्रॅव्हो (२३), सॅम्युअल्स(६५), रामदीन(४)बाद झाले असून चंद्रपॉल (०) खेळत आहे. कसोटीत पदार्पण करणा-या मोहम्मद शामीने ३ तर भुवनेश्वर कुमारने १ बळी टिपला. शमीच दमदार गोलंदाजीमुळे पहिल्यामचा सामन्याजत विंडीजचे कंबरडे मोडले आहे.

दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ईडन गार्डनवर आपली अखेरची कसोटी खेळणार असल्यामुळे सर्वांच्या नजरा तेंडुलकरवर आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धुवाधार कामगिरी करणारा रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी या दोघांनी या सामन्याद्वारे कसोटीत पदार्पण केले आहे. त्याणमुळे या दोघांच्याद कामगिरीकडे सर्पांचे लच लागले आहे.

Leave a Comment