
धावपळीच्या जीवनात चार निवांत विसाव्याचे क्षण मिळावे यासाठी माणूस पर्यटनाला पसंती देतो. मात्र लोकप्रिय पर्ययन स्थळांवर होत असलेली गर्दी ही चार क्षणाची शांतता मिळू देत नाही. जगात आजकाल दुर्मिळ बनलेल्या या साध्या गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी प्रथमच राष्ट्रपिता म.गांधी यांनी १९१५ मध्ये गुजराथेत अहमदाबाद जवळ स्थापलेल्या पहिल्या आश्रमाने पर्यटकांना उपलब्ध करून दिली आहे. बापूजींच्या या आश्रमात रात्रीला १००० रूपये असा दर आकारून पर्यटक राहू शकणार आहेत.

या ठिकाणी उतारूंना आधुनिक सुखसुविधा मिळणार नाहीत मात्र गांधी जसे जगले त्या साध्या राहणीचा अनुभव मात्र जरूर घेता येणार आहे. शिवाय येथे चरखा चालविणे, स्थानिक लोकाशी भेटीगाठी, प्रार्थना, मेडिटेशन करता येणार आहे तसेच खादी वापरता येणार आहे.


