टीम इंडिया ऑस्ट्रेलियात आज फायनल

बंगलोर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमधला सातवा आणि अखेरचा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेमध्ये २-२ ने बरोबरी केल्याने मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्याक आहे.

आतापर्यंत सहा सामन्यांपैकी दोन सामने पावसामुळे वाहून गेले आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकणा-या संघाच्या गळ्यात मालिका विजेतेपदाची माळ पडणार आहे.

दोन्ही संघांची मदार फलंदाजांवर असले. फलंदाजांनी आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये सुमारे २५०० धावा फटकावल्या आहे. तर गोलंदाज सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही तडाखेबाज फलंदाजी करत मालिका जिंकून तमाम क्रिकेटचाहत्यांना दिवाळीची गोड भेट देण्याचे आव्हान टीम इंडियापुढे असणार आहे. बेंगलोरमधील चेन्नास्वामी स्टेयडियम नेहमीच टीम इंडियासाठी लकी ठरले आहे; त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड वाटते.

Leave a Comment