
मुंबई – गरीब शेतक-यांची पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या सावकारी कायद्यात केंद्राने सुचवलेल्या सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने आता राज्यात हा कायदा लागू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून होणारी गरीब शेतक-यांची पिळवणूक थांबवण्यासाठी 2010 मध्ये विधिमंडळाने सावकारी विधेयक मंजूर केले होते आणि अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवले होते.
