रणजीत सचिनचे शानदार अर्धशतक

चंदीगड – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या अखेरच्या रणजी सामन्यात शानदार अर्धशतक ठोकलंय. हरयाणाविरुद्ध रणजी सामन्यात सचिननं दुसर्‍या डावात अर्धशतकाची वेस ओलांडली आहे. सचिनचं हे रणजी ट्रॉफीमधलं एकोणीसावं आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं 115 वं अर्धशतक ठरलंय.

मुंबईच्या गोलंदाजांनी हरयाणाचा दुसरा डाव 241 धावांत गुंडाळला. त्यामुळे मुंबईसमोर विजयासाठी 240 धावांचं लक्ष्य आहे. कौस्तुभ पवारनं 47 तर अजिंक्य रहाणेनं 40 धावांची खेळी केली. रहाणे आणि पवार बाद झाल्यानंतर सचिननं अभिषेक नायरच्या साथीनं मुंबईच्या डावाला आकार दिला. सचिन आणि नायरनं चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. सचिन आपल्या खेळीनं मुंबईला विजयाच्या दिशेनं नेताना दिसतोय.

Leave a Comment