प्रियांका गांधीचा रायबरेलीत जनता दरबार

रायबरेली – मंगळवारी सकाळी दहा वाजता काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी यांनी जनता दरबार भरवून रायबरेली व अमेठीतील स्थानिक लोकांच्या अडचणी आणि तक्रारी समजून घेतल्या. हे दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व प्रियांकाचा भाऊ व काँग्रेसचा उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आहेत. १० वाजता सुरू झालेल्या या दरबारात प्रियांका यांनी ३०० नागरिकांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या मागण्या ऐकून त्या शक्य तितक्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आलेल्या लोकांच्या तक्रारी प्रियांका यांनी स्वतःच घेतल्याचे समजते.

जनता दरबारात आपले गार्हाेणे मांडण्यासाठी आलेल्या लोकांनी वैयक्तीक औषधोपचारासाठी मदतीपासून ते रस्ते व पिण्याचे पाणी इथपर्यंत सार्‍या तक्रारींची दखल घेतली. या वेळी त्यांनी नव्याने नियुक्त केलेल्या ग्रामपंचायत, न्याय पंचायत नेते व ब्लॉक लिडर यांच्याशीही बातचीत केली. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पुढील दोन महिन्यात करावयाच्या कामांची यादीच त्यांनी यावेळी सांगितली. त्यात सरकारने आणलेल्या अन्नसुरक्षा विधेयकाची अम्मलबजावणी न केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध तसेच या विधेयकाच्या प्रसारासाठी पदयात्रा असे अनेक कार्यक्रम त्यांनी आखले असल्याचे समजते. त्यांनी यावेळी १ हजाराहून अधिक कार्यकर्त्यांशीही संवाद साधला.

Leave a Comment