रोहतक: मास्टर बलास्टार सचिन तेंडूलकरच्या दमदार खेळीच्या जोरावर बुधवारी अखेरच्या रणजी सामन्यात मुंबईला विजय मिळवून दिला. रोहतकमध्ये झालेल्या रणजी सामन्यात सचिनच्या झुंजार खेळीमुळे मुंबईने हरियाणावर विजय मिळवता आला. मंगळवारपासून दिवसभर खेळपट्टीवर पाय रोवून असलल्या सचिनने बुधवारी धवल कुलकर्णीच्या साथीने संयमी फलंदाजी करीत मुंबईला विजय मिळवून दिला.
मुंबईच्या आजच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली तेव्हा विजयासाठी अवघ्या ३९ धावांची गरज होती. पण सचिन आणि धवलने संथ गतीने सुरुवात करून हरियाणाच्या गोलंदाजांना विकेट काढण्याची संधी दिली नाही. सचिनच्या याच धोरणी खेळीने कसोटीच्या चौथ्या दिवशी मुंबईने हरियाणावर विजय मिळवला.
सचिनची रणजी क्रिकेटमधली अखेरची कसोटी पाहण्यासाठी देशातल्या कानाकोप-यातून चाहत्यांनी रोहतकमध्ये गर्दी केली. लाहिलीच्या या शेवटच्या सामन्यात सचिनने मंगळवारी अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्याने कालच्या नाबाद ५५ धावांवरून आज खेळायला सुरूवात केली. दुस-या डावात त्याने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत मुंबईला हरियाणाविरूद्ध विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, आज चौथ्या दिवसाच्या खेळासाठी सचिनने मैदानात एन्ट्री घेताच प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी सचिनला मानवंदना दिली.