संजय दत्तची रजा संपल्याने जेलमध्ये रवानगीची शक्यता

मुंबई- अभिनेता संजय दत्तची मंगळवारी येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. संजय सध्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर गेल्याग तीस दिवसांपासून बाहेर आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी तो मे महिन्याळपसून येरावडा जेलमध्येो आहे. १ ऑक्टोफबर रोजी त्युरचर पॅरोलवर सुटका झाली होती. त्यालनंतर त्यांने १५ दिवस रजा वाढवून घेतली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने तो जेलमध्ये हजर होण्याची शक्यता आहे.

कैद्यांने संचित रजेचा फॉर्म भरल्यानंतर सहा महिन्यानंतर त्याच्या संचित रजेवर विचार केला जातो. संजयला तुरुंगात जाऊन केवळ तीन महिने झाले आहेत. मात्र त्याने अर्ज केल्यानंतर काही दिवसांतच त्याला पॅरोल मिळाला. तसेच पॅरोल मिळाल्यानंतर लगेच संजय दत्तला रजा वाढवूनही मिळाली. त्यामुळे संजय दत्तला वेगळा न्याय का? असा सवाल विचारला जातो आहे.

संजय दत्तने नवरात्र आणि दसरा पत्नी आणि मुलांसोबत साजरा केला असला तरी त्याची दिवाळी तुरुंगात इतर कैद्यांसोबत असणार आहे. १ ऑक्टोबर रोजी पॅरोलवर बाहेर आलेल्या संजय दत्तची रजा २९ ऑक्टोबरला संपत आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेली असून तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे.दरम्यान, संजय दत्तची पाच वर्षांची शिक्षा कमी करावी अशी मागणी करणारा अर्ज राष्ट्रपती कार्यालयात पोहोचला आहे.

Leave a Comment