अभिनेता शाहरूख खान सोबत पूर्वीप्रमाणे आता दोस्ती राहिली नाही. गेल्या काही दिवसांपासून शाहरूख त्याच्या कार्यक्रमामध्ये खूपच व्यस्त असतो. त्यामुळे त्याला बोलण्याासाठी देखील वेळ मिळत नाही त्यामुळे आमची दोस्ती आता पूर्वीसारखी राहिली नाही,असे मत अभिनेत्री जूही चावला यांनी व्यक्त केले.
याबाबत बोलताना जूही मह्नली, ‘ कोणची पण दोस्ती एक सारखी नसते त्यामध्ये थोडा फार बदल असतो. तसे पाहिले तर बॉलिवूडमधील सर्वचजण खूप व्यस्त असतात. त्याना कामामुळे वेळ सुध्दा मिळत नाही. शाहरूख कामात खूपच व्यस्त असतो. त्यामुळे त्यााला वेळ मिळत नाही. त्यामुळेच आमच्याकडे दोस्ती साठी खूप वेळ नाही. मात्र आम्ही अजूनही चांगले दोस्त आहोत यामध्ये काहीच शंका नाही.’’
मी केवळ शाहरूखच्या बाबतीत बोलत नाही तर सिनेइंडस्ट्रीमधील सर्वांकडे बोलण्यासाठी वेळ नाही. आम्ही दोघेजण चांगले मित्र आहोत. शाहरूख आणि माझी जोड़ी हिट राहिली आहे. दोघांचे ‘राजू बन गया जेंटलमैन’, ‘डर’, ‘डुप्लीकेट’, ‘यस बॉस’ काही सिनेमे हिट झाले असल्याचेही जूहीने यावेळी स्पष्ट केले.