मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली शेवटची कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळणार हे आता निश्चत झाले आहे. त्यामागे हे स्टेडिअम सचिनचे होम ग्राउंड आहे हे जसे खरे आहे तसेच आपल्या कारकिर्दीची ही शेवटची मॅच तरी निदान आपल्या आईने प्रत्यक्ष येऊन पाहावी ही सचिनची इच्छाही आहे. शिवाय सचिनने आपल्या प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्याची सुरवात याच ठिकाणी केली होती.
सचिनच्या आई रजनी या आजारी असून व्हिलचेअर शिवाय बाहेर जाऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे क्रिकेट क्षेत्रात अनेक विक्रम नोंदविणार्या या आपल्या पराक्रमी मुलाची एकही मॅच त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली नाही. त्यामागे भारत संघ हरू नये अशी त्यांची इच्छा होती व म्हणून हा मोह त्या कायम टाळत आल्या. मात्र आता आपली शेवटची मॅच आईने पाहावी अशी सचिनची इच्छा त्या पुरी करणार आहेत असे सांगितले जात आहे. आपल्या चोवीस वर्षांच्या झंझावाती कारकिर्दीचा शेवट सचिन या मॅचने करणार आहे. या मॅचेला सचिनचे गुरू रमाकांत आचरेकरही हजर राहणार आहेत.