
मुंबई – साखर कारखानदारांनी कामगारांचे पगार वेळेत द्यावेत, नाहीतर कारखान्यांना सरकार मदत करणार नाही असा सज्जड दम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे. महाराष्ट्र सहकारी साखर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शहाणपणाने वागा, असा सल्लाही पवारांनी दिला.