राग आल्याने ऐश्वर्याने केली पत्रकार परिषद रद्द

लुधियाना येथे ऐश्वर्या-रॉय बच्चन कल्याण ज्वेलर्सच्या ५२व्या स्टोअरच्या उद्घाटानाकरिता गेली होती. त्या ठिकाणी ऐश्वर्याला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी काही चाहत्यांनी ढकला-ढकली केल्याने ऐश्वर्या रॉय खाली पडता-पडता वाचली. या सर्व प्रकरामुळे ती भलतीच रागाला आली. त्यामुळेच तिने रागाच्या भरात याठिकाणी आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सहभागी न होताच तेथून निघून गेली.

यावेळी राणी झाशी रोडवरील कल्याण ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटनावेळी ब्रॅड अम्बेसेडर असलेलेल्या‍ ऐश्वर्या रॉय-बच्चनच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ऐश्वार्या म्हणाली, ‘येथील नागरिकांचे माझ्यासाठीचे प्रेम पाहून मला फार आनंद होत आहे. त्या‍सोबतच येथील नागरिक पती अभिषेक, सासरे अमिताभ आणि मुलगी आराध्या यांच्यावर करत आलेल्या प्रेम आणि समर्थनाकरिता सर्वांचे आभार मानले.’

ज्वेलर्सचे उदघाटन केल्यानंतर ऐश्वर्याला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केली होती. त्यामुळे ती खाली पडता-पडता वाचली. या गोष्टीने नाराज होऊन ऐश्वर्याने पत्रकार परिषदच रद्द केली आणि ती ज्वेलरीच्या दुकानातून थेट थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या हॉटेलवर निघून गेली.

Leave a Comment