
नवी दिल्ली – भारतात बनलेल्या कोणत्याही इलेक्ट्रोनिक उत्पादनाला यापुढे जगात कोणत्याच देशात गुणवत्ता तपासणीची गरज भासणार नसून अन्य देशांत तयार झालेल्या इलेक्ट्रॅनिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादने तपासून त्यांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार भारताला गुरूवारी प्राप्त झाला आहे. भारताने अशा उत्पादनांना दिलेले सर्टिफिकेट जगातील सर्व देशांत ग्राह्य मानले जाणार आहे.
