दुबई, – काही दिवसांपूर्वी झालेल्या ऍशेस कसोटी मालिकेत प्रतिस्पर्धी संघांनी पंचांच्या चुकीच्या निर्णयांवर जाहीरपणे टीका केली होती. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक डावाच्या ८० षटकांनंतर आता दोन्हीस संघांना दोन अतिरिक्त रिव्ह्यू देण्याचा निर्णय ‘आयसीसी’ने घेतला आहे. हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यासमुळे आता एका डावात चार रिव्ह्यू मिळणार आहेत.
वादग्रस्त ‘डीआरएस’ प्रणालीला ‘बीसीसीआय’चा विरोध का आहे हे आता क्रिकेट जगताला कळून चुकले आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या ऍशेस कसोटीत पंचांच्या खराब कामगिरीमुळे ‘आयसीसी’ने कसोटी क्रिकेटमध्ये ‘डीआरएस’मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या प्रत्येक संघाला दोन अयशस्वी रिव्ह्यूसाठी सूट दिली जाते. आता येत्याव काळात अतिरिक्तय दोन रिव्ह्यू मिळणार असल्या ने आता एका डावात चार रिव्ह्यू मिळणार आहेत.
य संदर्भात ‘आयसीसी’च्या मुख्य कार्यकारिणीची दुबई येथील मुख्यालयात नुकतीच दोनदिवसीय बैठक झाली. याच बैठकीत ही घोषणा करण्यात आली असून ‘डीआरएस’ प्रणालीतील तथ्यांची समीक्षा करण्यासाठी एक कार्यकारी समितीही स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.