सातवी आयपीएल भारताबाहेर खेळविली जाण्याची शक्यता

नवी दिल्ली – बीसीसीआय ने इंडियन प्रिमिअर लिगचे पुढील वर्षातील सामने भारताबाहेर भरविण्याचा विचार चालविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही सातवी मालिका २०१४ सालात होत असून हे सामने दोन महिने चालणार आहेत. मात्र याच काळात भारतात लोकसभा निवडणका आहेत. त्यामुळे हे सामने भारताबाहेर खेळविले जातील असे समजते.

२००९ सालात याच प्रकारे लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचे सामने एकाचवेळी आले होते. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या हायफाय सामन्यांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे हे सामने दक्षिण आफ्रिकेत खेळविले गेले होते. यावेळीही हीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता लक्षात घेऊन क्रिकेट बोर्डाने श्रीलंका तसेच बांग्ला देश क्रिकेट बोर्डांशी सामने खेळविण्याबाबत बोलणी सुरू केली आहेत असे सांगितले जात आहे.