
वॉशिंग्टन :- किशोरवयीन मुला-मुलींमध्ये शाळेत मारामार्या होतात, त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मुले म्हटल्यानंतर भांडणे होणारच, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मारामारीमध्ये होणार्या जखमा आणि मानसिक धक्का यामुळे मुलांचा बुध्यांक कमी होतो असे अमेरिकेतल्या काही संशोधकांना आढळले आहे. दोन मारामार्या आणि दोन जखमा या मुलाच्या बुध्यांकाची एवढी घट करतात की त्यांची तुलना एक वर्ष वाया गेल्यामुळे होणार्या नुकसानीशी करावी लागते. मुलींच्या बाबतीत वेगळे निष्कर्ष निघाले आहेत आणि या संबंधात किशोरवयीन मुले मुलांपेक्षा नाजूक असतात असे दिसून आले आहे.
