प्रिटोरिया – तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढत बुधवारी रंगणार आहे. भारत ‘ अ ‘ आणि ऑस्ट्रेलिया ‘ अ ‘ यांच्यात आज चुरशीचा सामना होणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी भारताने शिखर धवनच्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने ४३३ धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
साखळीतील दोन्ही लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चांगली टक्कर दिली आहे. दोन्ही लढतींत भारताचा विजय थोडक्यात हुकला होता. कर्णधार चेतेश्वर पुजारावर भारतीय संघाची विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान असले. महेंद्रसिंह ढोणीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी , तिरंगी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतर विराट कोहलीने झिम्बाब्वेला ५-०ने पराभूत केले होते. आता पुजाराला ही विजयाची परंपरा कायम राखायची आहे. रोहित शर्मा , मुरली विजय , शिखर धवन यांचे स्थान अंतिम फेरीत कायम राहण्याची शक्यता आहे. सुरेश रैना , अम्बटी रायुडू आणि अजिंक्य रहाणे यांच्यापैकी एकाचे स्थान धोक्यात आहे. गोलंदाजांवर अचूक मारा करण्याचे आव्हान असेल.
२४८ धावांची खेळी करणा-या शिखर धवनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज जस्टीन ओन्टोंग याने तर आपण पाहिलेली सर्वोत्कृष्ट खेळी असल्याचे म्हटले आहे. शिखर धवनने तिहेरी शतक पूर्ण करू शकलो असतो. मात्र , तिहेरी शतक पूर्ण करू न शकल्याचे दु:ख नसल्याचे सांगितले. त्याचसोबत आपल्या खेळी पेक्षा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचीच खेळी सर्वोत्कृष्ट असल्याचे कबूल त्याखने केले आहे.