रंजन सोढीला यंदाचा ‘खेल रत्न’

नवी दिल्ली: भारतीय क्रीडाक्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असलेला यावर्षीचा राजीव गांधी ‘खेल रत्न’ पुरस्कार डबल ट्रॅप शूटर रंजन सोढीला जाहीर करण्यात आला आहे. त्या्सोबतच क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘अर्जुन’ पुरस्कारासाठीच्या शर्यतीत टीम इंडियाचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कांस्यपदकाची कमाई करणा-या पीव्ही सिंधूच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

ट्रॅप शूटर रंजन सोढीने २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन रौप्य पदकांची तर एशियन गेम्समध्ये एका सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई करणारा तो पहिलाच भारतीय नेमबाज ठरला. ‘खेल रत्न’ पुरस्कार स्वीकारणारा रंजन सोढी हा भारताचा सातवा नेमबाज ठरला आहे.

टीम इंडियाचा डॅशिंग क्रिकेटपटू विराट कोहली आणि सिंधूचा सध्याचा फॉर्म पहाता या दोघांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पहिल्यांदाच कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणा-या टीम इंडियाने झिम्बाब्वेचा ५-० असा सुफडासाफ करीत निर्भळ यश मिळवले होते. नुकत्यापच झालेल्याय जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारी पीव्ही सिंधू ही एकमेव भारतीय महिला ठरली आहे. त्यामुळे या दोघांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.