
नवी दिल्ली – यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा डबल ट्रॅप शूटर रोंजन सोढीचं नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आलंय. सोढी वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तर आपल्या बॅटिंगनं क्रिकेट जगत गाजवणार्या विराट कोहलीची निवड अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. रोंजन सोढीनं भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मेडल्स मिळवून दिली आहेत. त्यामुळं त्याची खेलरत्न पुरस्काराठी निवड करण्यात आलीय. खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जातो. तर वन-डे, टेस्ट आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये कोहलीनं आपल्या बॅटिंगनं कमाल केली आहे.