श्रीनगर – पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील सीमारेषेजवळील परिसरात गोळीबार केला. पाक सैनिकांनी सीमारेषेजवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या चौकीवर हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारताचे पाच जवान शहीद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही घटना सोमवारी मध्य रात्री नंतर घडली. गेल्या सहा महिन्यांत ३३ वेळा पाकिस्तानी सैन्याने नियमांचे उल्लघंन केले आहे. दरम्यान , संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी हे या हल्ल्याबाबत मंगळवारी संसदेत निवेदन सादर करणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून हा गोळीबार केला आहे . जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘ट्वीट’द्वारे हल्ल्याच्या बातमीची पुष्टी केली आहे. या हल्ल्यामध्ये भारताचे पाच जवान शहीद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी कित्येकवेळा पाकिस्तानी सैन्याने युद्धविरामाचं उल्लंघन केले आहे. गेल्या सहा महिन्यांत ३३ वेळा पाकिस्तानी सैन्यानं नियमांचं उल्लघंन केलंय. संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी हे या हल्ल्याबाबत मंगळवारी संसदेत निवेदन सादर करणार आहेत. युद्धनियमांचं सर्वाधिक वेळा उल्लंघन जुलै महिन्यात झालं असल्याची माहिती सोमवारीच संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत दिली होती.