मारहाण केलेल्या पाच आमदारांचे निलंबन मागे

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना पाच आमदारांनी मारहाण केली होती. त्या मारहाण प्रकरणामुळे दोषी आढळलेल्यान पाच आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्याग सर्व पाच आमदारांचे निलंबन मागे घेतल्याची घोषणा बुधवारी विधानसभेत करण्यात आली.

भारिप आमदार क्षितीज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, काँग्रेस वीरेंद्र जगताप, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जयस्वाल यांच्यासह १४ आमदारांनी मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात करण्यात आली होती. या आमदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय आमदांनी सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात मारहाण केली होती. या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांना निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र, त्याआधीच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

अहवालानंतर भारिप आमदार क्षितीज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते. आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मागणी केली होती. पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश होता. त्यापैकी राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली होती. त्या, सर्व पाच आमदारांचे निलंबन मागे घेतल्याची घोषणा बुधवारी विधानसभेत करण्यात आली.

Leave a Comment