अक्षय,शाहरूखपासून रणबीर दूर

येत्या ऑगस्ट महिन्यात अभिनेता अक्षय कुमार आणि शाहरूख खानचा सिनेमा रिलीज होत आहे. मात्र यामध्ये पुन्हा रणबीरचा सुध्दा एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर एक दिवशीच रिलीज होणार होते. मात्र रणबीरने यातून माघार घेतली आहे. आगामी काळात ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ आणि ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ या सिनेमाशी होनारी टक्क‍र रणबीरने टाळली आहे.

त्या मुळेच आगामी कळात रिलीज होत असलेल्या ‘बेशरम’ या सिनेमाच्या ट्रेलरची लॉन्चींग त्यांने वेगळया पध्दतीने केली आहे. त्या‍चे प्लैनिंग रणबीरने स्मार्ट पदध्तीने केले आहे. त्यामुळे आगामी काळात सतत चर्चेत राहण्यासाठी रणबीरने वेगळी शक्क्ल लढवली आहे. रणबीरने सिनेमाचा डायरेक्टर अभिनव कश्यप या दोघांनी पण एका मोठया इवेंटवेळी सिनेमाचा प्रोमो लॉन्च करण्या़वर सहमती झाली आहे.

त्यामुळे रणबीरच्या ‘बेशरम’ या सिनेमाचा प्रोमो आगामी काळात म्हणजे २ आगसट रोजी येणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात येणा-या दोन सिनेमापूर्वी प्रोमो लॉन्च करून सर्वांचे लक्ष इकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. शाहरूख-अक्षयच्या मोठया सिनेमाच्या लढाईत फसण्यापेक्षा रणबीर आणि अभिनवने ‘बेशरम’ या सिनेमाचा प्रोमो लॉन्च करण्याची ही वेगळीच आयडीया अंमलात आणली आहे.

Leave a Comment