मंत्र्यांच्या उपस्थितीचा घेणार मुख्यमंत्री आढावा

मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंत्र्यांची उपस्थिती कमी झाली असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली असून आगमी काळात मंत्र्यांच्या उपस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.

धारावी येथील क्रीडासंकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांना काही पत्रकारांनी मंत्र्यांची सभागृहातील उपस्थितीबाबत विचारले असता मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘यापुढील काळात मंत्र्यांची सभागृहातील उपस्थिती वाढावी, यासाठी आपण लक्ष देणार असून यापुढील काळात प्रत्येक मंत्रयाचे हजेरीबुक तपासले जाईल.’

दोनच दिवसांपूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत
नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे गैरहजर राहणा-या मंत्र्याला निलंबित केले पाहिजे,
असा रोष सर्वसामन्य नागरिकातून व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याने आता तरी मंत्रयाची उपस्थिती वाढेल का असा सवाल उपस्थीत केला जात आहे.

Leave a Comment