बस-ट्रकच्या धडकेत चौघेजण ठार

मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये चौघे जण जागीच मरण पावले. तर अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील टोळ फाट्याजवळ घडली. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे.

शुक्रवारी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील टोळ फाट्याजवळ लक्झरी बस आणि ट्रकची समोरसमोर धडक झाली. यामध्ये चौघे जण मरण पावले तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारसाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतुक रात्री उशीरपर्यंत विस्कळीत झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून या मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. हा महामार्ग चौपदरी करण्याची गेल्या कित्येक दिवसांची मागणी आहे. पण, या महामार्गावर आणखी किती बळी जाणार असा सवाल नागरिकामून उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment