
पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) -राज्यातील सामान्य रिक्षाचालकांना निवृत्ती वेतन, विमा, वैद्यकीय योजना, घरांसाठी एक समिती स्थापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन महिन्यांत ही समिती प्रस्ताव सादर करणार आहे, अशी माहिती आमदार मोहन जोशी, रिक्षा कृती समितीचे सरचिटणीस नितिन पवार यांनी दिली.
राज्यातील ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेची कृती समिती त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. विधी मंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात 17 एप्रिल 2013 रोजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कल्याणकारी मंडळाबाबत घोषणा केली होती. पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
