विद्यासाठी लिहणार महेश पटकथा

बॉलीवूडचा फेमस दिगदर्शक महेश भटने यापूवी अनेक सिनेमाच्या पटकथा लिहल्या होत्या. त्यामधील काही सिनेमे हिट सुध्दा झाले आहेत. त्यामुळेच आता त्याने १४ वर्षांच्या अंतरानंतर एका विशेष सिनेमासाठी पटकथा लिहण्याचे ठरविले आहे. सध्या तो अभिनेत्री विद्या बालनसाठी ही विशेष पटकथा लिहणार असल्याचे समजते. आगामी काळात तो एक भावनिक प्रेमकथा असणा-या सिनेमात विद्या बालन ही दोन नवीन चेह-यांसोबत झळकणार आहे.

यापूर्वी महेश भट यांनी ‘अर्थ’, ‘सारांश’, ‘जख्म’ सिनेमाच्या पटकथा लिहल्या आहेत. यातून त्यांचे कौशल्य प्रेक्षकांसमोर आणले होते. १४ वर्षांच्या कालावधीनंतर सिनेनिर्माता महेश भट हे पुन्हा आपल्याव लिखाणाची जादू दाखवणार आहेत. ते त्यांच्या आगामी सिनेमासाठी पटकथा लिहणार आहेत. ‘विशेष फिल्मस’च्या ‘गॅंगस्टर’, ‘मर्डर ३’, ‘जिस्म २’ या सिनेमासाठी महेश यांनी केवळ पटकथेच्या कल्पना दिल्या होत्या.

‘आशिकी-२’ या सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सुरी आगमी काळात येत असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या नव्या ने येणा-या सिनेमाचे चित्रीकरण या वर्षीअखेरीस सुरु होईल. या सिनेमात डर्टी गर्ल विद़या बालन सोबत दोन नवीन चेहरे झळकणार आहेत. या सिनेमासाठी विशेष पटकथा महेश भट लिहीत असल्‍याने या सिनेमाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment