मी ब्रेक घेतला नाही- विद्या

अभिनेत्री विद्या बालन तिचा विवाह झाल्यापासून कामात खूपच बिजी आहे. तिने कसलाच ब्रेक घेतला नाही. मात्र काही जणांच्या मते तिने मधल्या काळात ब्रेक घेतला होता असे म्हणने आहे. विद्या बालनच्या मते तिने गेल्या १५ महिन्यापासून फिल्म इंडस्ट्रीमध्येच ब्रेक घेतला नाही.

याबाबत बोलताना विद्या बालन म्हणाली, ‘मी ‘कहानी’ या सिनेमानंतर १५ महीने बॉलीवूडच्या कामातून कसलाच ब्रेक घेतला नाही. मी नेहमीच सिनेमाच्या, कामात व्यस्त असते. ‘कहानी’ या सिनेमानंतर मी ‘घनचक्कर’ या सिनेमाच्या तयारीला लागले. त्या सिनेमानंतर मी एक महिन्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ‘शादी के साइड इफेक्ट’ या सिनेमाचे शुटिंग सुरू केले. त्यांनतर मी कान फिल्म फेस्टिवलमध्येच सहभागी झाले होते. मी गेल्या १५ महिन्यापासून अविरत काम करीत आहे.’

‘घनचक्कर’ या सिनेमातील तिच्या भूमिकेविषयी बोलताना ती म्हणाली, ‘घनचक्कर’ या सिनेमात पंजाबी हाउस वाइफची भूमिका केली आहे. ही भूमिका करीत असताना मला खूप मजा आली. आगामी काळात या सिनेमाकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत.

Leave a Comment