दुखापतीमुळे धोनी टीम इंडियातून बाहेर

नवी दिल्ली- सध्या वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतून दुखापतीमुळे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी बाहेर पडला आहे. त्याची जागा आता विराट कोहली घेणार आहे. त्या मुळे आगामी काळात या तिरंगी मलिकेत तोच टीम इंडियाचा नेतत्व करणार आहे. धोनीचया गैरहाजरीत भारतीय संघ तिरंगी मालिका जिंकणार का याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

रविवारी झालेल्या तिरंगी मालिकेतील वेस्टइंडीजविरुद्धच्या सामन्यात कर्णधार धोनीच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. दुखापतीमुळे त्याला खेळने कठिण झाले होते. दुखापतीमुळे त्यांनतर धोनी क्षेत्ररक्षणासाठीही आला नव्हता. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. आज मंगळवारी भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. यासाठी तो तंदुरूस्त नसल्याचे सोमवारीच समजले होते.

सोमवारी जमैकातील रुग्णालयात धोनीची चाचणी करण्यात आल्यानंतर त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे कर्णधार धोनीने मायदेशी परतण्यारचा निर्णय घेतला आहे. त्याच्याजागी भारतीय संघात अंबाती रायडूची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ११ जुलैपर्यंत चालणार आहे. धोनीला स्पर्धेला मुकावे लागल्याने टीम इंडियाला धक्का बसला आहे. आगामी काळात टीम इंडियाची मदार यंग बिग्रेडवर असणार असून त्यांच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment