टीम इंडियासमोर आज श्रीलंकेचे आव्हान

किंगस्टन – रविवरी झालेल्या अटातटीच्या सामन्यांत टीम इंडियाला विंडीजकडून पराभव पत्करावा लागला. तिरंगी स्पर्धेतील पुढचा साखळी सामना मंगळवारी (२ जुलै) होत आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर समोर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. दोन्ही संघाला सुरूवातीच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय महत्वाचा आहे.

चँपियन्स ट्रॉफी जेतेपदानंतर टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वाचे लागले आहे. वेस्ट इंडिजच्या तळातील क्रिकेटपटूंचा ‘रोल’ यात महत्त्वपूर्ण राहिला. रोहित शर्मा आणि सुरेश रैनाने चांगली फलंदाजी केली तरी भारताला २०-२५ धावा कमी पडल्या. श्रीलंकेविरुद्ध फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवने सुरुवातीला प्रभावी मारा केला. भारताच्या फिरकीपटूंना विविधता आणण्याची गरज आहे.
त्याव तुलनेत श्रीलंकेला अनेक समस्या जाणवत आहे. पहिल्या लढतीत यजमानांनी त्यांच्यावर बोनस गुणाने विजय मिळवला. त्यामुळे सर्व आघाडय़ांवर कामगिरी उंचावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. चँपियन्स ट्रॉफीत हरवल्याने मंगळवारच्या लढतीत टीम इंडियाचे पारडे जड वाटते.

कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने ही सीनियर जोडी तसेच तेज गोलंदाज लसित मलिंगा आणि प्रभावी फिरकी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. सबिना पार्क खेळपट्टीकडून फिरकीपटूंना अपेक्षित यश मिळत नसल्याने तेज गोलंदाजांवर सांघिक यशापयश ब-यापैकी अवलंबून आहे.