पाठ्य पुस्तके आता खाजगी प्रकाशक तयार करणार

पुणे,दि.26:ˆगेल्या चार पाच वर्षातील पुस्तकनिर्मितीतील अडचणी लक्षात घेवून राज्यशिक्षणमंडळाने पाठयपुस्तके अंशत: खाजगी प्रकाशकाकडून तयार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यशिक्षण मंडळ इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची काही पुस्तके खाजगी प्रकाशकाकडून तयार करून घेणार आहे. त्यात शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून इयत्ता नववी ते बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे व या अंतर्गत भाषेतर विषयांची इंग्रजी व मराठी माध्यम सोडून उर्वरित माध्यमाची पाठ्यपुस्तके भाषांतरे करून घेणार आहे.

याबाबत माहिती देताना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले, पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. इयत्ता 11 वी आणि 12 वी साठी पाठ्यपुस्तके भाषांतर करताना मंडळाची मराठी व इंग्रजी माध्यमाची पुस्तके प्रमाणित मानून भाषांतर केले जावे. तसेच सदर भाषांतराची व ती तपासून घेण्याची पूर्णत: जबाबदारी संबंधित प्रकाशकाची राहणार आहे. याबाबत मंडळ स्तरावर कार्यवाही होणार नाही किंवा मंडळाकडून त्याला मान्यता आणि शिफारसही देण्यात येणार नाही.