कोकण रेल्वेतला पावसाचा फटका

नवी मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळली आहे. त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला असून त्याठिकाणची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला आहे. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली आहे. या पावसामुळे एकंदरीत कोकण रेल्वेतचे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे.

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने विलवडे गावाजवळील रेल्वे रुळांवर माती आल्याने कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाली होती. कोकण रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून माती आणि दगड बाजुला केले आहेत. त्यानंतर दीड ते पावने दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली. रूळावर छोटासा दगड आला होता. तो बाजुला करण्यात आल्यानंतर आता रेल्वे सुरळीत सुरू आसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या‍ काही दिवसांपासून सतत पडणा-या पावसाचाही परिणाम मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर दिसून आला. जनशताब्दी एक्स्प्रेसही रत्नागिरी स्थानकात थांबवण्यात आली होती. तर मडगाव-दिवा ही गाडी आडवली स्थानकात थांबविण्यात आली होती. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना थोडासा त्रास सहन करावा लागत आहे. या पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे.

Leave a Comment