डंपर आणि क्वालिस अपघातात ११ जणाचा मृत्यू

त्नागिरी- संगमेश्वरुन मुंबईकडे निघालेल्या क्वालिस गाडीला रविवारी रात्री उशीरा साडेबाराच्या सुमारास खेड येथील दाबिळ गावाजवळ हा अपघात झाला. मुंबई-गोवा हायवेवर रात्री उशिरा झालेल्या डंपर आणि क्वालिस गाडीच्या भीषण अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला . अपघातात मरण पावलेल्यांमध्ये तीन चिमुड्यांसह तीन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत हे एकाच कुटुंबातील असून मुंबईतील मालाडचे रहिवाशी आहेत.

मुंबईच्या दिशेने निघालेल्या क्वालिस गाडीला समोरुन येणा-या डंपरने जोरदार धडक दिल्याने क्वालिसमधील अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईत वास्तव्याला असणारे चव्हाण कुटुंबिय संगमेश्वर येथे मुलगी पाहण्यासाठी क्वालिस गाडीने गेल्याचे कळते. तिथून परतताना खेडजवळ चव्हाण यांच्या क्वालिसला भरधाव वेगाने येत असलेल्या एका डंपरने धडक दिली.

या धडकेमुळे क्वालिसगाडी रस्ताच्या कडेला फेकली गेली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली. गाडीला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आल्याचे समजते. गाडीतील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Comment